Showing posts with label आयशॉट. Show all posts
Showing posts with label आयशॉट. Show all posts

Nov 21, 2011

‘आयशॉट’च्या वहीतून - माझा आवडता पकशी !

झुरळ हा पकशी आहे काय ? ह्या अंत्याच्या प्रश्नाने आमी गानगरुनच गेलो. अंत्या मदेच असे पायाखालची जमिन सळो कि पळो वाव्ही असे प्रशन विचारत आस्तो. पर्वा त्याची कटिंग जालेली आसल्याने तेच्या भांगाची लाइन दोन शेतामदल्या बांधासारखी दिसत होति व दोनी बाजूला साइडला हिरवे व मदे काळेकबिन्न अशा कापलेल्या केसांचे शेत त्याच्या डोक्याच्या वरती पसरले होते. खरोखरिच अंत्याचे डोके फारच सुपिक आहे ज्यातून की कुठला प्रशन कोणच्या वेळेस उगवेल हे कोणालाच सांगता येत नाही. (माईणकरच्या मात्र उजव्या मेन्दुची अवाजवी वाढ झाल्याने त्याचा भांग नीट पडत नाही).

आमाला मराठीला आमच्या रुशितुल्य काट दरे बाई जाउन चिरके नावाचे आतिचशय हिनसक व मार कुटे सर आले आहेत. पैल्या दिवशीच तुम्चा आवडता पकशी हा निबंद लिहुन त्यानि आणाव्यास सांगितले आसल्याने आमि सर्व विचारान्च्या गरतेत तरंगत होतो. सर तासभर घसा खर वडून ओरडून जाल्यावरती जेवा दुस-या वरगात जाण्यासाठी अंतरधान पावले तेवा अंत्या सरांच्या खुर्चिमदे जाउन बसला व त्याने वरील मऊलिक प्रश्न केला. सरव जण एकमेकानच्या मुकखमलाकडे टका व मका पाहू लागले.

काही झुरळे उडत आसली तरी झुरळाला चोच नसल्याने तो पकशी नाही असे बाणेदार उत्तर ओतुरकरने दिल्यावर अंत्यासुद्दा चकित झाला. मिसुद्दा झुरळ घरटे बांदत नसल्याने तो पकशी नाहीच असे तेजसवी उत्तर दिले. तेवा नेमीच चप्पल अथवा बूट शोधाव्यास उदयुक्त कर्णारे झुरळ कोणाचेच आवडते नसल्याचे सरवांच्या निदरशनास आले. त्यामुळेच त्यावर निबंद लिहू नई कारण की तो पकशी समजा आसला तरी आवडता अजिचबात होणार नाही असे सरवामुनते ठरले. हि भरुन वाहून चाललेली एकि पाहुन मला चवथि यत्तेमदिल एकिचे बळ हा धडा आठवून माजे रुदयही लगबगून आले.

आता आवडता पकशी शोदण्याच्या मोहिमेत गुनतून आमचे मन पकश्याप्रमाणेच कलपनेच्या आकाशात विरहू लागले. वेग वेगळ्या पकश्यांच्या विचार करताना मला तर आतिचशय गोंधळल्यासारखे होवून धडधडू लागले होते. कोणाचा रंग माला आवडे तर कोणाची चोच तर कोणाची शेपूट. कोणाचे आकार मान आवडे तर कोणाची नुस्तीच मान.

मला बगळा हा नेमी आनघोळ करुन भांग पाडल्यासार्खा स्वछ्छ दिसत आसल्याने आतिचशय आवडतो. त्यावरती मी निबंद चालू कर्णार तेवाच लक्शात आले कि त्या पक्शाचे चित्रहि निंबदाशेजारी सरानी काढून आणाव्यास सांगितले आहे. आता पांड-या कागदावरती पांडराच बगळा कसे बरे काढायचा ह्या प्रशनाने माजी दुपारची झोप बगळ्यासारकी उडाली. बगळा उबा राहतो त्याप्रमाने मी कॉटवरतुन एक पाय खालि सोडूनही विचार करुन पाहिले पण पांड-या रंगाचा प्रशन तसाच लटकत रायला. शेवटी मग मी बगळ्याला मनातून हुस कावून लावले व इतर उडणारे प्राणी आठवू लागलो. जन्नी ही शोधाची गरज आहे हे वाटसरे बाईंचे अलवकिक वाक्य आठवून जिव थोडा जिवात आला व मी माजा आवडता पकशी शोधू लागलो.


Sep 19, 2010

‘आयशॉट’च्या वहीतून : आम्च्या सोसायटीतला गणेशोत्सव !

एणार एणार असे हा हा म्हण्ताना गणेशोत्सव हा सण येऊन ठेप्लाच. गणेशोत्सव हा शब्द माज्याकडून १२१ वेळा काट दरे बाईनी लिहून घेत्ल्यामुळे मी आता अजिचबात चुकत नाही.

मला गणपती बाप्पा आतिचशय आवडतो. कारण कि तो चांगली बुद्दी देतो जी की परिकशेच्या वेळेस उपयोगी पडते. गणपती बाप्पा विद्येची देवता आहे. पानचाळ सर म्हणतात की प्रत्येक देव कशा ना कशाचा तरी आधी पती आहे. दर परिकशेच्या वेळी विशेशता वारशिक च्या वेळी मी गणपतीची रोज मनो भावे तपशचरया करतो. पण चांगली बुद्दी देण्याच्या आयवजी गणपती बाप्पाने डायरेक चांगले मारक दिले आसते परिकशेत तर किती चांगले होइल. आपण सरवांनी कोणच्या तरी देवाची रोज कमीत कमी तपशचरया कराव्यास हवी (१० मिन्टे लिहावयाचे राहिले ते कंसात लिले आहे).

गणेशोत्सव असतो तेवा सरवत्र आतिचशय मंगलमय वातावरण आस्ते. बाजारात सुद्दा ने वेद्याचे मोदक पेढे व बरफी असे बोर्ड लागून दुकानांची शोभा वाडलेली आसते. सरवत्र रोश्णाइ व लाय टींग केलेले आसते. ते काईकाई वेळा फिरतेही आसते. म्हन्जे की ते तिथेच आस्ते फ्क्त लाईट फिरत असतात पकडा पकडी खेळल्यासार्खे. ठिक ठिकाणी मंडप उभारून रसत्यांची व वातूकीची शोभा वाडवलेली आसते. मंडपाशेजारी स्पिकरांची एकावर एक दहीअंडी करून त्यावरून नवीन हिन्दी पिच्चरमदली गाणी करणमधूर आवाजात लावलेली आसतात. फक्त त्या आवाजात गणपती बाप्पाला लोकांची तपशचरया ऐकू जाईल का अशी मला नेमी भिती वाट्टे.

आमच्या सोसायटीतही गणेशोत्सव असतो मदल्या चौकात. त्या काळात मुले मुली, तसेच प्रोढ व मोठी माणसे तसेच बायका वगेरे आतिचशय उतसाहाने फसफसत आसतात. बायकांमदे रोज बाप्पाला नवनवीन ने वैद्य टिवीत बगून बनवायची चडाओड लागते. ने वेद्य काय आहे त्यावर आरतीला गरदी आसते असे सागरगोटे काका म्हणताना मी आयकले. दरेक दिवशी आर्ती करताना सरव मुले कडव्याची पैली ओळ मोठ्या आवाजात म्हणतात व नंतर आर्ती पाठ नसल्याने मोठ्या लोकानच्या तोंडाकडे पहात बसतात. साठेंचा मुलगा हात जोडून नुस्ता ने वेद्याकडे पहात आसतो. नेनेन्चा राजू दादा प्रदानांच्या पिन्की ताइकडेच पहात आसतो एकसार्खा असे सिकरेट जितूने सांगितल्याने आमी सरव लहान मुलानी खातरी केली. पिन्की सुद्दा मदेमदे पाहत एडपटासार्खी हासत होती. कोलेजमदल्या एवड्या मोठाल्या मुलाना हे सुद्दा कळत नाही का की आर्तीला गंबीरपणाने उभे रहावयाचे आस्ते ? पिन्कीची तपशचरया करून राजू दादाला काय मिळनार ते बाप्पाच जाणे. ह्या वरशी आसे केले तर मी सरळ मोठ्यादी ओरडनार आहे ए राजू दादा समोर बघ म्हणून आसे.

काई काई गोशटी मात्र मला बुच कळ्यातच पाडतात. आता जासवंदीचे फूल आवडते म्हून काय रोज तेच तेच काय फूल वहायचे. बाप्पाला तरी वरायटी नको काय ? मला जिल्बी आवडते म्हणून काय रोज दिली तरी मला कंटाळाच येईल नाई का दोन तिन मैन्यानी. मस्त लाल गुलाबाचे फुल दिले आणिक ने वेद्याला चोकोलेट दिले तर देव नाई म्हण्णार आहे का ? पण मोठी लोक आइकतील तो सुदीन.


Jul 8, 2009

आयशॉटच्या वहीतून - विदन्यान आणि हिवाळा

आयशॉट !

सहावी 'ड' मधल्या ‘आयशॉट’ ला सारखे ‘आयशॉट’ म्हणायची सवय (‘आईशप्पथ’ चा झालेला तो अपभ्रंश). जसे जसे त्याच्या वह्यांतून सापडते तसे तसे त्याचे लेखन आम्ही प्रकाशित करत असतो. अगदीच वाचता येणार नाही तिथेच फक्त शुद्धलेखनाच्या चुका सुधारतो.. पण सर्व लिखाण त्याचेच.. त्याच्याच मनातले थेट वहीत उतरलेले.

त्याला स्वत:लाही त्याचे ते टोपण नाव ‘आतिचशय’ आवडते : आयशॉट !

***

निबंद लिहाव्यास सांगितला की माला आगदी प्राण घशापाशी येतात असे वाट्टे. पानचाळ सर आमाला नेमी नेमी निबंद लिहाव्यास सांगतात व स्वता टेबलावरती मान ठेवून झोपी जातात. ढापण म्हण्तो की ते अशा वेळी आगदीच सीता सयंवर इन फुजी कलर ह्या सिनेमामद्ल्या कुंबकरणासारखे दिस्तात असे म्हण्तो. (ढापण स्वताही चशमा लावलेल्या कुंबकरणासारखा दिसतो वर गात झोपतो तेवा). काही वेळा काही समाजकनटक मुले सरांच्या झोपण्याची नक्कल करितात ते त्यांना आजिचबात शोभत नाही. गुरुजनान्नी जरि मान टाकली तरि आपण मान ठेवावयास नको का ?

पानचाळ सर वर गात कदि कदि जागे आस्तात तेवा आतिचशय शांतता माज्लेली आसते. पण आज तास सुरु होऊनही खूप वेळ निघून गेला तरी सरांचा ठाव व ठिकाणा नवता. मग काही समाजकनटक मुलानी ऑफ तास असल्याची अफवा उठविली. पण टिवीवर सार्खे सार्खे सांगतात त्याचप्रमाणे आमी अफवेवर विशवास ठेवला नाही तसेच कुठल्याही सनशयास्पद वस्तूला हातही लावला नाही.

भाहेर आतिचशय कडाक्याचा पावूस पडत होता. आमी सवंगगडी खिडकीजवळ जमाव करून बाहेरील गोगल गायी बघू लागलो. गोगल गाय हा कधी भू तर कधी उभय चर प्राणी आसतो. तो नेमीच सरपटी जातो. उतक्रानतिचे टप्पे पडण्याआधी सगळेच जण सरपटी जायचे असे अंत्या म्हणाला. (वर राणारे भिंगार्डे आजोबा आहेत त्यांची घरी आजींपुडे गोगलगाय होते असे सगळे मोठे लोक म्हणतात बिलडिंगमदले. मी एक्दा लपून बघणारे की ते घरी सर्पटतात का ते म्हन्जे त्यांची उतक्रानती झालीये का ते लगेच कळेल. चवकस दुष्टी हे विदन्यानिकाचा गुण आहे असे विदन्यान्याच्या वाटसरे बाई म्हण्तात) अंत्या वाईट म्हण्जे आतिचशय हुशार आहे. जितू म्हणला की अंत्या नेमी मशिन लावून नांगरल्यासार्खे केस कापतो त्यामुळेच त्याचे डोके सुपीक झाले आहे. तो साच्लेल्या पाण्यातून तसेच कोरडवाहू जमीनीवरून सर्पटत सर्पटत चालू शकतो. (तो म्हन्जे अंत्या नव्हे तर गोगल गाय हा प्राणी).

असे आमचे गोगल गायिंचे विदन्यानिक कोनातून बघणे चालू आस्ताना अंत्याने गंबिरपणे एक मऊलिक प्रश्न केला की तो म्हण्ला की तुमी कधी विचार केलात का तुमी की गोगल गायी आपल्याकडे कशा कोनातून पहात आसतील? खरोखरच अंत्याचा मेंदू चवकस व धारदार आहे. मग जितू म्हणला की गोगल गायीना तर आपण राकशस वाटत आसणार. (आणि ढापण म्हन्जे चश्मिस राकशस. कुम्बकरण कुठचा)

ढापण काही बोलणार एवड्यात खेकसण्याचा आवाज आला. पानचाळ सर वर गात आले होते. सार्याना पळो की सळो झाले. मी घाबरून कसाबसा लपून गोगल गायीसार्खा सर्पटत सर्पटत माझ्या शेवटच्या बाकापरयंत पोचलो व चडून बसलो. सराना झोप आगदीच आसह्य होत होती असे त्यांच्या डोळ्यांकडे व हाल चालीकडे बघून वाटले. आमाला पुरेसे ओरडून झाल्यावर्ती त्यान्नी आम्हाला हिवाळा ह्या विश्यावर निबंद लिहावयास सांगितला व नेमीप्रमाणे टेबलावर मान टाकली.

आता पावूस पडत आस्ताना हिवाळ्याचे दिवस कसे बरे आठवणार ? पण सरांच्या गळ्यात घंटा कोण बांदणार ? त्यामुळेच आम्ही मुकाटपणाने लिहू लागलो.

हिवाळा हा रुतु माला आतिचशय आवडतो. आगदी सुरुवातिला थंडी पडते तिचा रंग गुलाबी आसतो. खरे म्हन्जे माला थंडी मला दिसतच नाही कदी तर रंग कसा कळणार ? पण सगळेच गुलाबी म्हणतात म्हन्जे ते खरे आसणार. हिवाळ्यात लोक कपडे घालतात जे की इतर रुतुत घालत नाहीत (लोकरीचे असे लिहावयाचे राहिले ते कंसात लिले आहे)

विशेश्ता मुसळधार थंडी पडते त्या दिवशी लोक लोकरीचे कपडे घालतात. उन व पावूस आकाशामदून जमिनिकडे खाली येतात. तशी थंडी कुठून येते ते कुणालाच समजत नाही. पण नोवेम्बर मैन्यात ती खाली येऊन साचू लागते व वारा वायला की इकडून तिकडे जाते. बकरी हा आतिशय उप्योगी पाळीव पशू आहे. तो दुध तसेच लोकरीचे गुंडे वगैरे उपयोगी गोशटी रोज सकाळी आपणास देतो. लोकरीच्या गुंड्यापासूनच कपडे बनतात नाहीतर हिवाळ्यात लोकानी काय केले आस्ते ह्याचि कल्पनाच कर्वत नाही. गाय हाही आतिचशय उपयोगी पशू आहे पण तो लोकर देत नाही तर फक्त दूध देतो. गोगलगाय तर दूध व लोकर दोन्ही देत नाही त्यामुळेच तो हिवाळ्यात भूमिगत होवून दिसेनासा होतो. फक्त पावूसाळ्यात कळपाने बाहेर पडतो.

हिवाळ्या रुतुमधे फळे तसेच फळावळ आतिचशय छान मिळतात. फळांमदूनच आपणास वेग वेगळ्या आक्शरांची जिवनसतवे मिळतात. (ती ह्या वरशी सामाईला पाच मारकांना आहेत). हिवाळ्यात दिवाळी, नाताळ, बालदीन, ख्रिसमस असे सणासुदीचे दीन येतात. तेव्हा शाळेला मधे मधे सुट्टी आसल्याने सरवत्र मंगलमय वाता वरण आस्ते. सुट्टीच्या शेवटच्या दिवशी मात्र प्राण आगदी घशाशी येतात. कारण पहिल्या दिवशी सर्व बाई आणि सर सामाई परिकशेचे तपासलेले पेपर वाटतात. अंत्या नेमी पैला येत आसल्याने तो मात्र आतिचशय खूश आसतो.

हिवाळ्यात दरडी व कडे कोसळत नसल्या ने तो पावूसाळ्या सार्खा प्राण घातक रुतु नाही. तसेच थंडीमुळे शेवाळे व निस रडेपणा होत नाही. त्यामुळे पुटफाथ वरुन जाणारी वाने व रसत्यामधून जाणारे पादचारी ह्यांची पडझड होत नाही. तसेच उनाचा त्रास होवून उशमाघातही होत नाही. थंडीच्या रुतुत सर्व पदारथ प्रर्सण पावू लागतात. त्यामुळेच हिवाळ्यात मुले गुट गुटीत व सुदरुढ होण्यास चालना मिळते.

फक्त शाळेत जाताना माला माकडटोपी घालायाला अजिचबात आवडत नाहीत. कारणकी तशी टोपी घालून निट आयकू येत नाही. मी रिकशासाठी उभे अस्ताना समोरचे जे राणारे आहेत तेंच्याकडे आलेली ती मुलगी जी माज्याचएवढीच आहे ती बाहेर येउन बघते आणि माज्याकडे पावून तोंडावर आडवा हात धरून हासत बसते. मग मी चिडून माकडटोपी काढूनच टाकतो पण थंडी जोरात येउन कानावर वाजते. परवाच्या सकाळच्या दिवशी ती हासता हासता म्हणाली की आमाला माकड आणि टोपीची गोशट माला माहितच आहे मुळी असे म्हणली. मी चिडून तिला मारावयाला जाणार होतो पण त्यांच्या बंगल्यात अल सेशन कुतरा आहे. तो पाळिव आसला तरी मोठा पशू आसल्याने मी राग खावून टाकला व थंडीपासून प्राण वाचवण्याकरिता कान दाबून ठेवले. हिवाळ्यामुळेच माला वाईट साईट न आयकणार्या माकडाप्रमाणे कानावर हात ठेवायची शिकवण मिळाली.

असा हा हिवाळा रुतु माला खूप खूप आवडतो मितर व मयत रिणीनो.

आयशॉट उरफ राफा – सहावी ड




 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा

 


Jan 1, 2008

आयशॉटच्या वहीतून - आम्ची सहल !

अहा हा ! एणार एणार म्हणताना सहलीचा दिवस आलाच. आक्शरशा सुवरणाच्या आक्शरानी लिहून ठेवून देण्याचा तो दिवस होता (आमच्या वर्गात सुवरणा चित्रेचे आक्शर सर्वात चांगले आहे).
सकाळच्या मंगल वेळी पक्शी कोकीलकूजन करत होते. मि व अंत्या एकत्र शाळेत पोचलो तेव्हा बसचा पत्ताच नव्हता. साखरदांडे सर नेहमीचसारखे रागीट दिसत होते (त्याना आम्ही उसाचं चिपाड म्हणतो कारण की ते काडीपेल्वान आहेत) . आज ते बसवाल्यांवर अतिचशय चिडले होते. आपल्या देशात वेळापत्रकातल्या वेळेचे महत्व लोकाना नेमी उशिरा कळते. पक्शी घड्याळ न घालताही योग्य वेळी किल्बी लाट करतात मग माणसे तसे का करत नाहीत बरे ? मी अंत्याला हे सांगितल्यावरती तो म्हणाला की घड्याळ घालावयास पक्शांना हात नसतात त्यामुळे त्यांचे घड्याळ अदरुश्य असते. मग शेवटी एकदाचे बसवाले आले.
बसमधे चढताना सरवाना रोमहर्शक वाटत होते. पण तेव्हढ्यामधे गायतोंडेच्या वेणीला कुणीतरी चुंगम चिक्टवण्याचे निन्दनीय क्रुत्त केल्याचे समजताच ती किंचाळली. मग साखरदांडे सरानी तिच्या जवळील एक दोन मुलाना झोडपून शासन केले. बसमधे मजल दरमजल करत अस्ताना आम्ही मुले विरुद्ध मुली अशा गाण्याच्या भेंड्या खेळत होतो. मुलांवर चऊदावी भेंडी चढत असतानाच आम्ही शनिवार वाड्यापाशी पोचलो.
शनिवार वाडा हा आयतीहासिक किल्ला आहे. एका पेशवे आडनावाच्या राजांनी तो बांधला होता. ते घरचे श्रीमंत होते. ही मऊलिक माहिती अंत्याने आम्हाला दिली. अंत्याला आयतीहासिक गोष्टींची खूपच माहिती आहे (साखरदांडे सरांपेक्षाही जास्त).
वाड्यापाशी गुरे, गायी, म्हशी व रेडे इत्यादि पाळीव व उपयुक्त पशू होते. वाड्याची भिंत तीन पुरुष उंच आहे असे उपासने सर म्हणाले. अबब असे म्हणत आम्ही मनाशीच एकावर एक माणसे चढवून दहीहंडी करुन पाहिली तर ती ४ माणसे होवू लागली. कदाचित पुर्वीच्या पुरुषांपेक्शा आत्ताची माणसे बुटकी झाली असावीत. त्यामुळे थोडा गोंधळ उडत आसातानाच गुर नावाच्या एका पाळीव पशूने मला धक्का दिला. त्या धक्क्यातुन सावरल्यावर मी पुन्हा भिंतीचे निरिक्शण करु लागलो.
उपासने सरानीच आम्हाला जिदन्यासा हा एक मोठा गुण आहे हे शिकविले आस्ल्यामुळे मी लगेच ही एव्हढी उंचच उंच भिंत बांधली कशी आसेल आसं विचारलं. तर ते वसकिनी आमच्या अंगावर खेकसले. मग अंत्या हळूच म्हण्ला की एकावर एक उभे राहून तीन मजूरानी ती बांधली असेल तर माईणकर म्हणाला की त्यांनी शिडी वापरली असेल. पण आधी भिंतच नसेल तर शिडी टेकवणार कशावर ? असा प्रशन मला पडला होता तो पडूनच राहिला.
पण ह्या उदाहरणावरून आपल्याला अरवाचीन शिल्पकला किती प्रगतीशिल होती हेच दिसत नाही का ?
आत जाताच उपासने सर आम्हाला भराभर भराभर माहिती देवू लागले. ती काहीच कळत नसल्याने आम्हाला जणू काही त्यांच्या तासाला बसल्यासारखेच वाटले. पूरवी तिथे अरवाचिन बाग तसेच बगीचे वगेरे होते. (त्यावेळीही हरित क्रांति झाली होति काय असा प्रशन मला विचारायचा होता परन्तु सर पुन्हा वसकिनी ओरडावयाच्या भितिने मी मटकी गिळून गप्पच राहिलो) . तिथे एक मोड कळीस आलेले दगडी कारंजेही होते. एके काळी त्यात खालून वर पाणी उडावयाचे. पण आत्ता ते बंद होवुन नादुरुस्त पडले होते. ह्यावरून त्या काळचे पाण्याचे पंपही प्रगतीशिल होते हेच दिसत नाही का ?
इतका विचार करावयाची सवय नसल्याने आम्हाला कडाक्याची भुक लागली. बाजारु खाण्याने प्रक्रुतीवर हानिकारक व खोलवर परिणाम होतात त्यामुळे आम्ही आमचे घरुन आणलेले डबे उघडले व वदनिक वळ घेता म्हटले. जेवताना उपासने सरानी काका मला वाचवाची गोश्ट सांगितली. त्यात हिंसा व खुनाखुनी असल्याने आमची छाती आतिशय धडधडू लागली. पण ती रहस्यमय गोश्ट ऐकुन आमचे न्यान खूपच वाढले.
दरवाजातून त्या काळी पिमटी बस कशी काय आत जात असेल असा प्रशन माईणकरने बाहेर पडताना विचारला. त्यावर साखरदांडे सर काही वेळ हत बुद्ध झाले. मग मात्र त्यानी माईणकरला बुकलायला सुरुवात केली. तेव्हा तो वेड्यासारखा काका मला वाचवा असे ओरडू लागला. मग आम्ही पर्तीच्या प्रवासासाठी बसमधे बसलो.
घरी आलो तेव्हा शेजारचे भिंगार्डे आजोबा आमच्याकडे आले होते. (ते खडूस आहेत. आम्ही त्याना डोमकावळा म्हणतो) त्यानी माज्यावर प्रशनांची सर बत्ती केली. मी आपली आठवून आठवून कशीबशी उत्तरे दिली. त्यावर त्यानी ' शनिवार वाड्यातच गेला होतात ना नक्की ? ' असे विचारले. (ते मला अजिचबात आवडत नाहित)
रात्री झोपल्यावरती मला विचित्र विचित्र अशी स्वपने पडली. एका स्वपनात तर मला वाड्याच्या दरवाजात अडकलेली पिमटी बस दिसत होती व टपावर माईणकर बसला होता. दुसर्या स्वपनामधे साखरदांडे सर भिंतीला टेकविलेल्या शिडीवर बसून चुंगम खात होते.
तर मित्रानो व मैतिरिणीनो , अशी झाली आमची आयतीहासिक वाड्याची रोमहर्शक सहल !
- आयशॉट उरफ राफा - सहावी ड


 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा

May 24, 2007

निबंद - पावूस !

पावूस !
- आयशॉट उरफ राफा (सहावी 'ड')
पावूस हा माजा आतिचशय आवडीचा रुतु आहे. पावूसामुळेच शेतात आंबेमोर भात व कणकेचे पिठ पिकते म्हणुनच आपण सगळे जेवू शकतो. पाउसाळ्यात मुख्यतवे गळीत हंगाम असतो. पाउसाळ्यात जास्त करून पावूस पडतो, हिवाळ्यात थन्डी पडते व उन्हाळ्यात ऊन पडते. त्यामुळे वरशभर कुठला ना कुठला रुतु पडिक असतो. 'रिमजिम पडती श्रावण गारा' हे गाणे आतिशय रोमहर्शक आहे. आमचा रेडियो गेल्या वरशी भिजल्याने बिघडला आहे त्यामुळे गाणे नीट ऐकू नाही आले तरीही आतिचशय आवडले.
पाउसाची सुरुवात रोमहर्शक असते. आधी कडाक्याचा उन्हाळा पडतो. पेपरमधल्या वृत्तपत्रात बातम्या येउ लागतात. 'उन्हाळा कमी होता की काय म्हणून आता पावसाने मारलेली आहे' अशी बातमी तर नेमीच असते (‘दडी’ हे लिहायचे राहिले ते कंसात लिहिले आहे ). सबंध आसमंत वातानुकुलित झालेला असल्याने खूप धूळफेक होत असते. (‘वात’ म्हणजे वारा हे कालच कोरडे सरानी शिकवले. कधी कधी ते ‘पोरांनी वात आणलाय ह्या’ असे म्हणतात त्याचा अर्थ मात्र कळत नाही.) अशा हवामानात सर्व पक्षी कोकीलकूजन करायचे थांबवून झाडांमधे गुपत होतात. काळे ढग जमल्यामुळे आकाशात थेटरमधे उशिरा गेल्यावर असतो तसा काळाकुट्ट अंधार होतो व मधेच डोअर किपरने लखकन बॅटरी मारावी तशी वीज चमकून जाते. सगळीकडे शेतकरी आभाळाला डोळे लावून बघत असतात आणि शेतकरण्या त्यांच्याकडे बघत असतात. अशा मंगल वातावरणात वरूण राजाचे आग मन होते.
भारतात पाउस अंदमान येथे बनतो. तो वळत वळत केरळ गावात आणि तिथून वळत वळत पुणे शहरात येतो. म्हणूनच त्याला वळीव म्हणतात किंवा काहीजण वळवाचा पाउस ही म्हणतात. (आम्ही समोरच्या गोगटे काकाना त्यांच्यासमोर 'काका' आणि इतर काळी 'तात्या विनचू' म्हणतो तसेच हेही दोन सन्मानार्थी शबद आहेत)
काल पुण्याच्या शहराच्या आत पाउस पडला. पुणे हे प्राचीन व प्रेकशणीय शहर आहे. तिथे शिन्दे छत्री, शनिवारवाडा, सिटी प्राईड, पर्वती, काकडे मॉल अशी पर्यटन स्थळे आहेत. ह्यातल्या काही ठिकाणी घरचे लोक मला रविवारी पर्यटनाला नेतात.
काल पाउसाबरोबर गाराही पडल्या. गोगटे काकानी बराचश्या जमवून त्यांच्या घरच्या माठात टाकल्या. ते कुठलीही फुकट गोशट वाया घालवत नाईत.
अंत्या आतिशय बावळट आहे. तो बाबांचे हेलमेट घालून गारा वेचायला आला होता. मग मीही छतरी घेऊन गेलो. पण छतरी उलटी करुन गारा वेचल्याने ती फाटली. समोरच्या मंगूने नवीन शरटं घातला होतान तर तसाच भिजायला आला आणि चिखलात घसरून पडला. (तो घरी गेल्यावर त्याच्या कानफाट नावाच्या अवयवावर त्याच्या बाबानी निरघुण प्रहार केले ते त्याना अजिचबात शोभत नाही.) एका दिवसात मंगूला एव्हढे मोठे गालगुंड कसे झाले हा प्रश्न वर्गात दुस़ऱ्या दिवशी सर्वाना पडला.
असा हा रोमहर्शक रुतु मला आतिचशय आवडतो !
***


 ह्या लेखाची PDF फाईल उतरवून घेण्यासाठी इथे क्लिक करा